साने गुरुजी मराठी निबंध | Sane Guruji Marathi Essay
![]() |
साने गुरुजी मराठी निबंध |
मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी साने गुरुजी या विषयावरती एक छानसा मराठी निबंध घेऊन आलो आहोत. तर हा निबंध तुम्हाला तुमच्या शालेय कामकाजासाठी
उपयोगी पडू शकतो. तर चला निबंधाला सुरुवात करूया.
मी पाचवीत असताना साने गुरुजींचे 'सुंदर पत्रे' वाचले. एका पत्रात सुधाला धर्माची कल्पना समजावून देताना गुरुजी लिहितात,
“ आपण पोस्ट कार्ड लिहित. त्यावर स्वच्छ, सुंदर अक्षरांत पूर्ण पत्ता लिहिला तर आपण पोस्टमन बाबतचा धर्म पाळला,
असे होईल.” धर्माची इतकी सोपी, सुंदर कल्पना माझ्या मनावर कायमची ठसली. गुरुजींच्या जीवनाचा हा अमूल्य नमुना
आहे. ते म्हणाले की, काम करताना आधी इतरांचा विचार करा. साने गुरुजींनी अगदी छोट्या छोट्या वाक्यातून महान
सत्य मुलांना सांगितले-
‘ खर तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।’ गुरुजी किती सोप्या शब्दांत धर्माची कल्पना मांडतात ! गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते.
साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म १८९९
मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्यांचे बालपण कोकणात गेले. त्यांच्या साहित्य कोकणातील हिरवेपणा व
आंब्यातील मधुरता भरून राहिली आहे.
गुरुजींनी मुलांसाठी भरपूर लेखन केले; कारण-
‘करील जो मनोरंजन मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे.’
अशी त्यांची भावना होती. ‘गोड गोष्टी’ ( दहा खंड ) , ‘ धडपडणारी मुले’ , ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ ( सहा खंड ),
‘तीन मुले’ असे उत्कृष्ट बाळासाहेब गुरुजी निर्माण केले. मुलांना गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन करणे हे गुरुजींचे वैशिष्ट्य होते.
यांचाच आदर्श ठेवून अनेक मंडळांनी ठिकठिकाणी ‘ साने गुरुजीं कथामाला’ सुरू केल्या.
गुरुजींच्या बाळ मनावर त्यांच्या आईने सुसंस्कार केले होते. त्यांच्या 'श्यामची आई' या पुस्तकात ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय आईला देतात आणि म्हणतात, "माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते माझ्या आईकडून
आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. त्यांनी मला प्रेमाने बघायला, प्रेमाने
बोलायला शिकवलं. मनुष्यावरच नव्हे; तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर व झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवले.
” साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा उल्लेख आचार्य अत्रे, ‘ मातृ प्रेमाचा महान मंगल स्त्रोत’ असा करतात, तर कवी वसंत
बापट म्हणतात, "श्यामची आई हे वाचण्यासारखे पुस्तक नाही, तर अनुभवायचे पुस्तक आहे." साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’
या कादंबरीवर आधारलेल्या आचार्य अत्रे निर्मित चित्रपटाला ‘ राष्ट्रीय सुवर्ण कमल’ हे पारितोषिक मिळण्याचा पहिला मान
मिळाला होता.
गुरुजींना भारतीय संस्कृती विषयी विशेष आदर होता. या संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यांनी त्यांच्या 'भारतीय संस्कृती' या पुस्तकात
सहज वर्णन केली आहेत. भारतातील अनेक भाषांविषयी गुरुजींना विशेष आकर्षण होते. विविध भाषांचा अभ्यास व्हावा
आणि त्यानिमित्ताने सर्व भारतीय अंतकरणाने एकमेकांच्या जवळ यावेत म्हणून त्यांनी ‘ आंतर भारती चळवळ’ सुरू केली.
गुरुजी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक सैनिक होते. 1942 च्या ‘ चले जाव’ चळवळीत ते भूमिगत होऊन कार्य करत होते.
नंतर त्यांनी तुरुंगवासही सोसला. साने गुरुजींची समाज विषयक जाणीवही सखोल होती. त्यांना जातीभेद, धर्मभेद बिलकुल
मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी पंढरपूरच्या देवळात सर्व जाती-पंतीच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले आणि प्रवेश
मिळवून दिला.
गुरुजींच्या प्रेमळ मनाला आजूबाजूचे हिंसक, अविचारी जीवन सहन न झाल्याने त्यांनी १९५० मध्ये आपली जीवनयात्रा
संपवली.गुरुजी देहाने गेले; पण त्यांनी पुस्तके, त्यांचे लेखन आजही आपल्यापुढे उच्च, उदात्त आदर्श ठेवते.
मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. अजून कोणत्या नव्या विषयावरती
निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या विषयावरती निबंध देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून
धन्यवाद
0 टिप्पण्या